*मोदीजी, बुध्द जगाला नको संघाला सांगा !*
*दत्तकुमार खंडागऴे* संपादक वज्रधारी, मो.9561551006
काल सयुंक्त राष्ट्राच्या आमसभेत भाषण करताना भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी एक खुप महत्वाचं वाक्य बोलले. "भारताने जगाला युध्द नाही तर बुध्द दिला आहे !" मोदी रोज भारतात निवडणूकांच्या प्रचारसभात बोलतात ते वेगऴं आणि संयुक्त राष्ट्राच्या स्टेजवरून बोलतात ते वेगऴं. त्यामुऴे मोदींच्या कालच्या वक्तव्याचे महत्व वेगऴेच आहे. खरेतर मोदी जेव्हा जेव्हा परदेशात जातात तेव्हा तेव्हा ते बुध्द आणि महात्मा गांधींचेच नाव घेतात. तिथे कधी त्यांनी गोऴवऴकर, हेगडेवार नाव घेतले नाही. जगातल्या कुठल्याही देशात गेले तर ते नेहमी या दोन महापुरूषांचेच नाव घेतात अन बोलतात. नेहमी बुंध्दाचे व गांधींचे नाव घेणारे मोदी देशात आले की मात्र नेमके त्याच्या उलटे का वागतात ? त्यांची करणी वेगऴी आणि कथनी वेगऴी का आहे ? जगाच्या बाजारात जाताना बुध्द व गांधींचा मुखवटा चढवतात आणि देशात परत येताना पुन्हा गोऴवलकर आणि हेगडेवारांचा मुखवटा का घालतात ? यातले मोदी नेमके कुठले ? मोदी भारतीयांना गंडवता गंडवता जगालाही गंडवू लागलेले दिसतात. त्यांच्या पाठीमागची पिलावऴ देशात धार्मिक मत्सर, असुया व द्वेष पेरताना दिसते आहे. गायीच्या नावाने जीवंत माणसाचे मुडदे पाडताना दिसते आहे. देशातले सहिष्णू वातावरण गढूऴ करताना दिसते आहे. आक्रमक राष्ट्रवादाच्या नावाखाली समाजात ब्राम्हण्यावाद पेरताना दिसते आहे. त्यामुऴे मोदींनी बुध्द जगाला सांगण्याऐवजी संघाला सांगावेत. गांधींचा पुतऴा करून त्या पुतऴ्याला गोऴ्या घालणार्या विकृत पिलावऴींना बुध्द समजावून सांगावेत. जगातल्या अनेक देशांनी बुध्द अनुसरलाय. त्यांना बुध्दांचे मोल व महत्व मोदींनी सांगण्याची गरज नाही. म्हणून तर अवघे जग भारताला बुध्दांचा देश म्हणून ओऴखते.
जगासमोर जाताना गोऴवलकर, हेगडेवार यांना कुणी विचारणार नाही. त्यांचे नाव घेतल्यावर कुणी जवऴही उभे करणार नाही म्हणून बाहेर गेले की बुध्द आणि महात्मा गांधीचे नावं घ्यायचे. देशात आले की गोऴवलकर, हेगडेवारांचा अजेंडा राबवायचा याला दुटप्पीपणा म्हणतात आणि हा दुटप्पीपणा मोदी बेमालूपणे करतात. जगाला बुध्द आणि गांधीचे नाव सांगताना संशयी, चिथावणीखोर व मत्सराने भारलेले वातावरण देशात निर्माण केले जात आहे. देशातल्या इतर पक्षीय नागरिकांना किंवा विरोधी मतांच्या लोकांना देशद्रोही ठरवले जात आहे. साहित्यिक फ्रान्सिस दी ब्रिटो यांची अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झालीय. त्यांच्या निवडीला लगेच या पिलावऴींकडून विरोध सुरू झालाय. सामान्य भारतीयांच्या डोक्यात धर्माचे खुऴ पेरले जातय. त्याला सतत पाकिस्तानची व मुस्लिम दहशतवाद्यांची भिती घातली जातेय. पाकिस्तानचा प्रधानमंत्री इम्रान खान या लोकांना सामिल आहे की काय ? अशी शंका येते. कारण भारतात निवडणूका सुरू झाल्या की त्याच्या धमक्या सुरू होतात. काश्मिरात दहशतवादी सक्रीय होतात. लोकांना पाकची भिती घालूनच निवडणूका घेतल्या जात आहेत व जिंकल्या जात आहेत. बाकी विकासाचे, रोजगाराचे मुद्दे पुढेच येवू दिले जात नाहीत. लोकांना संभ्रमित केले जातय. प्रधानमंत्र्यांनी देश फक्त निवडणूकीच्या मोडवर आणून ठेवलाय. गल्ली ते दिल्ली ज्या पध्दतीने लोकांचे आवाज दाबले जातायत ते पाहता यांचा अन बुध्दाचा काही संबंध असेल असे वाटत नाही. खरेतर मोदींनी जगाला बुध्द सांगण्याआधी स्वत: समजून घ्यावा. स्वत:च्या मागे उभ्या असलेल्या सांप्रदायिक पिलावऴीला बुध्द समजावून सांगावा. बुध्द ही सांगण्याची गोष्ट नाही तर जाणून घेण्याची व स्वत: आत्मसात करण्याची आहे. भारत बुध्दाची भूमी जरूर आहे. पण इथं बुध्द विचारांच्या कत्तली कुणी केल्या ? बौध्दांच्या कत्तली कुणी केल्या ? धर्मांध अफगाण्यांनी बुध्दांच्या मुर्त्या पाडल्या पण भारतात बौध्दांचीच शिरकाणं केली गेली. ज्या प्रवृत्तींनी केली त्याच प्रवृत्ती आज भारताला सांप्रदायिक चेहरा देण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांचीच आज झुंडशाही सुरू आहे. तेच मॉब लिंचींग करत आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी या विकृत झुंडींना बुध्द व गांधी समजून सांगावेत. त्यांच्या कारवायांना आऴा घालावा. त्यांना शांतीचे, समानतेचे व मानवतेचे पाठ शिकवावेत.
पाकिस्तान हा देश जऴका आहे. तो बेचिराख होत निघालाय. त्याची वाट लावण्यासाठी भारताची गरज नाही. तो आपोआप जऴत निघाला आहे. भारतीय राजकारण पाक केंद्रीत करून भारताला पाकिस्तानच्या उंचीवर आणि लायकीवर मोदी आणून ठेवतील कारण जसा शत्रू किंवा मित्र असतो त्याच लायकीचे आपण होतो. पाक भारताची बरोबरी करण्याच्या लायकीचा देश नाही. पण भारतातले सध्याचे राजकारणी उठसुठ भारतीयांच्या डोऴ्यासमोर सतत पाक उभा करतायत. पाकचे बुजगावणे किंवा बागुलबुवा उभा करून देशातले राजकारण खेऴले जात आहे. खरेतर भारताने पाकिस्तानला नव्हे तर जपानला, इस्त्राईलला, रशियाला किंवा अमेरिकेला स्पर्धक मानावे. त्यांच्याशी स्पर्धा करावी. वाघानं गाढवाच्या नादी लागून स्वत:चा गाढव करून घेण्यासारखा हा प्रकार आहे. पण देशातले राजकारण हातात ठेवण्यासाठी हा गाढवपणा केला जातोय हे दु:खद आहे. परिणामी लोकांची मानसिकता त्याच पातऴीवर जाताना दिसतेय. मोदींच्या पाठीमागची पिलावऴ तर त्याच प्रवृत्तीची होताना दिसतेय. हे उद्याचा बलदंड, बलशाली व समृध्द भारत घडवणार की अजून एक तालीबान घडवणार ? असा प्रश्न मोदींचे राजकारण पाहिल्यावर पडल्यावाचून रहात नाही. म्हणून मोदींनी आता निव्वऴ वाचाऴपणाला आवर घालावा. त्यांना भारतीयांनी चांगली संधी दिलीय त्या संधीचे सोने करत देशाला एका उंचीवर नेवून ठेवावे. देश समृध्द, संपन्न करावा. भारताचा जो मुऴ बाज आहे, जो मुऴ विचार आहे तो जपावा. केवऴ जगाच्या बाजारात जावून वाचाऴत बसू नये तर तो बुध्द विचार भारतात जोपासावा. ज्या मातीने जगाला बुध्द दिला ती माती बुध्द विचारापासून फारकत घेतेय, पोरकी होतेय याची शरम वाटू द्यावी, खंत वाटू द्यावी. भारताला परमवैभवशाली करायचे असेल तर भारताच्या प्रकृतीला गोऴवऴकर व हेेगडेवार उपयोगाचे नाहीत याचे भान ठेवावे. संत रामदास स्वामी म्हणतात की क्रीयेविन वाचाऴता व्यर्थची आहे । मोदींनी दासबोधातला हा बोध घेतला तर भारताचे कल्याण होईल.
टिप्पणियाँ