*आर्थिक मंदी व शांततेसाठी जागतिक धम्म परिषद,- बौद्ध धम्मगुरू पुज्य दलाई लामा औरंगाबादेत*
जागतिक धम्म परिषदेचे औरंगाबाद येथे 22 ,23 व 24 नोव्हेंबर दरम्यान आयोजन करण्यात आले आहे. जागतिक बौद्ध धम्मगुरू पुज्य दलाई लामाजी यांच्येसह श्रीलंका, जपान, चीन, इंडोनेशिया या देशातील धम्मगुरू आणि पुज्य भिक्खू गण या धम्म परिषदेसाठी उपस्थित राहणार असल्याची माहिती पुज्य भदंत बोधीपालोजी महाथेरो ( अखिल भारतीय भिक्खू संघाचे महाराष्ट्र,अध्यक्ष) यांनी दिली. यावेळी लोकुत्तरा चैरिटेबल मिशन चे पुज्य भदंत काश्यपजी व सनदी अधिकारी आयुष्यमान डॉ. हर्षदीप कांबळे हे उपस्थित होते.
या परिषदेमध्ये जगातील आर्थिक मंदी आणि शांतता यावर ही चर्चा होणार आहे.
बौद्ध जगतातील जी काही महत्वाची बौद्ध चळवळीची ठिकाणे आहेत त्यामध्ये आपले स्वःताचे एक वेगळेपण जपून नव्याने उदयास येत असलेले चौका-औरंगाबाद येथे ही ऐतिहासिक धम्मपरिषद संपन्न होत आहे.
जागतिक धम्म परिषद औरंगाबाद शहरातील मिलिंद महाविद्यालयाच्या नागसेनवन परिसरामध्ये आयोजित करण्यात आली आहे. या परिषदेला जागतिक बौद्ध धम्मगुरू दलाई लामाजी यांच्यासह श्रीलंका येथील पुज्य भन्ते गुणरत्नजी महानायक डॉ. वाराकागोडाजी महाथेरो यांच्यासह देशातून अनेक मान्यवर बौद्ध भिक्खू उपस्थित राहणार आहेत. या परिषदेच्या माध्यमातून तथागत भगवान बुद्ध यांनी दिलेला शांतीचा संदेश हाच जगाला दुःख मुक्तीकडे घेऊन जाऊ शकतो, तर दुसरीकडे जगभरात निर्माण झालेली आर्थिक मंदी यावर बुद्धाच्या विचारातून मार्ग निघू शकतो, यावर ही या धम्मपरिषदेमध्ये चर्चा केली जाणार आहे. या परिषदेत १३ देशातील प्रतिनिधी चर्चासत्रातून संवाद होणार आहे.
जागतिक धम्म परिषदेचे आयोजक आणि सनदी अधिकारी डॉ. हर्षदीप कांबळे यांच्या मते, देशांमध्ये विचारवंताची अशा प्रकारची ही पहिली परिषद औरंगाबाद येथे होत आहे. या परिषदेच्या माध्यमातून विविध देशातील धम्मगुरू यांच्याशी विचारांची देवाणघेवाण होणार असून यासाठी श्रीलंका, नेपाळ, कंबोडिया, जपान, व्हिएतनाम, बर्मा, थायलंड यासह 13 देशातील बौद्ध भिक्खू उपस्थित राहणार आहेत. 22 नोव्हेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता उदघाटन समारंभ होत आहे.
23 नोव्हेंबरला सकाळी नऊ वाजता बौद्ध धर्मगुरू दलाई लामा हे जगभरातून आलेले मान्यवर भिक्खु गण बौद्ध जगतात नव्याने स्वःताची वेगळी ओळख म्हणून उदयास येत असलेले व जगप्रसिद्ध अजिंठा महामार्गावर थायलंड येथील उपासिका रोजना व्हनीच कांबळे आणि ज्येष्ठ अधिकारी डॉ. हर्षदीप कांबळे यांच्या दानातून निर्माण करण्यात आलेल्या भारतातील पहिल्या लोकुत्तरा भिक्खू सेंटर चौका च्या परिवेणेत दाखल होऊन येथे भेट देणार आहेत. अखिल भारतीय भिक्खू संघाचे,संघनायक पुज्य भदंत सदानंदजी महाथेरो आणि भारतातील भिक्खू उपस्थित असणार आहेत.
या परिषदेचा मुख्यसोहळा नागसेनवन येथे २४ नोव्हेंबरला सकाळी दहा वाजता दलाई लामा यांचे प्रवचन होणार आहे व त्यानंतर जागतिक धम्म परिषद औरंगाबाद ची सांगता होईल अशी माहितीही यावेळी आयोजकांकडून देण्यात आली.
या जागतिक धम्म परिषदेला जास्तित जास्त बौद्धांनी उपस्थित राहण्याचे आवाहन लोकुत्तरा महाविहार मिशन मधिल ललिता पखाले व सुधाकर पखाले, प्रवर्तक "धम्मस्थान स्तूप", सद्धम्म प्रचार केंद्र मालेगांव जिल्हा वाशिम यांनी केले आहे.
टिप्पणियाँ